साताऱ्यात उष्णतावाढीमुळे आले लागवड रखडणार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  ः अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारी आले लागवड उष्णतेत झालेल्या वाढीमुळे रखडणार आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून दरातील अस्थिरतेमुळे आले पिकाच्या क्षेत्रात घट झाली आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह दुष्काळी तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून आले पीक घेतले जाते.   

आले पिकाच्या दरात अस्थिरता असताना देखील जिल्ह्यात आले पिकाची लागवड सातत्याने होत असते. यंदा दराच्या अस्थिरतेसह वाढलेली उष्णता, यामुळे संथगतीने आल्याची लागवड सुरू आहे. जिल्ह्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकरी आले लागवड करतात. या हंगामात नदीकाठी व कॅनॉलचे पाणी उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी आले लागवडीसाठी पूर्वमशागत सुरू झाली आहे.

जिल्ह्यात साधारणपणे २५०० हेक्‍टरवर आल्याची लागवड होते. मुहूर्तावर यातील सुमारे १५ ते २० टक्के आल्याची लागवड होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

वाढलेल्या तापमानात लागवड केलेल्या आल्याची उगवण उशिरा होते. तसेच, आल्याचे कोंब विकृत पद्धतीने वाढून उत्पादनावर परिणाम होतो. तसेच उत्पादनावर परिणाम होतो, त्यामुळे शेतकरी उशिराने लागवड करणे टाळतात. 

दरम्यान दरातील घसरणीमुळे गतवर्षीप्रमाणे या हंगामात आले पिकांच्या क्षेत्रात ४०० ते ५०० हेक्‍टरने घट होण्याचा अंदाज आहे. 

आले सध्याचे दर  बियाण्याचे आले प्रतिगाडी  (५०० किलो) - १५ ते १८ हजार रुपये  विक्रीचे आले प्रतिगाडी (५०० किलो) - ११ ते १२ हजार रुपये

‘आले लागवडीसाठी क्षेत्र तयार करून ठेवले आहे. सध्या उष्णता वाढल्याने लागवड करणे शक्‍य होणार नाही. उष्णता कमी झाल्यावर लागवड करणार आहे.’  - जयवंत पाटील, प्रगतशील शेतकरी, पाल, जि. सातारा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com