सभागृह बंद पाडणे सरकारची हुकूमशाही : अजित पवार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. सरकारमधील लोकांची ही हुकूमशाही प्रवृत्ती असून, सरकारमध्ये सावळा गोंधळ सुरू असल्याचा आरोप विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला.

आम्हाला आज जी भीती होती तेच घडले. मी, जयंत पाटील आणि विरोधी पक्षातील अन्य सदस्य राज्यपालांच्या अभिभाषणावर भाष्य करणार होतो. राज्यातील अनेक मुद्द्यांवर बोलणार होतो; परंतु आम्हाला व्यक्त होऊ दिले गेले नाही. सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातला, असेही अजित पवार म्हणाले.

या सरकारने आज लोकशाहीचा खून केला आहे. या सरकारची ऐकून घेण्याची तयारीच नाही. कदाचित आम्ही विचारणार असलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नसणार म्हणून या सरकारने पळ काढला आणि याला अध्यक्ष साथ देतात, अशी शंका अजित पवार यांनी व्यक्त केली. 

उत्तर द्यावे लागेल म्हणून सभागृह बंद पाडले  सरकारमधील सदस्यांनी सभागृहामध्ये गोंधळ घालत सभागृह बंद पाडले. विरोधी पक्ष प्रश्न विचारेल म्हणून जाणूनबुजून हा प्रकार सत्ताधाऱ्यांनी केला, असा थेट आरोप विधानसभा गटनेते जयंत पाटील यांनी केला. राज्य सरकारने आपल्या सदस्यांकडून गोंधळ घालून सभागृह बंद पाडले गेले, असे आम्ही कधी पाहिले नाही. शिवसेनेने प्रशांत परिचारक यांचा मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित करत गोंधळ घातला. शिवसेना वेळोवेळी सभागृहात भूमिका बदलत आहे. राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी विधानसभेत कोकणातील नाणार प्रकल्पाबाबत निवेदन केले. विरोधी पक्षांनी त्या निवेदनावर चर्चेची मागणी केली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर काहीच उत्तर दिले नाही, हे हास्यास्पद आहे. पोरकट कामकाज सुरू आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com