नगरमध्ये काँग्रेसचे सरकार विरोधात विश्‍वासघात आंदोलन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः ‘भाजप सरकारने सामान्य लोकांचा विश्‍वासघात केला आहे. दिलेल्या कोणत्याही अश्‍वासनाची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे लोकांचे जगणे अवघड झाले आहे. सरकार लोकांच्या खिशातून पैशाची लूट करत आहे, असा आरोप करत काँग्रेसतर्फे आज नगर शहरातील दिल्ली दरवाजा परिसरात विश्‍वासघात आंदोलन करण्यात आले.  

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार यांच्यासह शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, उबेद शेख यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेलार म्हणाले, ‘भाजप सरकार जनतेची फसवणूक करत असून, शब्द न पाळता विश्‍वास गमावत आहे. इंधन दरवाढ, शेतमालाला दर नाही, दुधाला दर नाही, राज्यातील उसाला दर नाही, साखरेला उठाव नाही, सरकार मात्र पाकिस्तानची साखर आयात करून शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळत आहे. 

राज्यात व देशात तरुणांना रोजगार नाही, महागाईने लोकांचे जगणे अवघड झाले आहे. असे असताना सरकार कोणत्याही बाबीची दखल घेत नाही. ‘अच्छे दिन’चे अजूनही आमिष दाखवले जात आहे. सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, शेतमाला दर मिळवून देण्यासाठी पावले उचलावीत. आता जर लोकांच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र अंदोलन करू, असा इशारा शेलार यांनी या वेळी दिला. या वेळी कार्यकर्त्यांनी काळ्या पट्ट्या बांधून सरकारच्या विरोधात घोषणाजी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com