विमा कंपनीच्या मनमानीमुळे शेतकरी त्रस्त

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव : जिल्ह्यात केळी पिकाचा विमा घेतलेल्या शेतकऱ्यांचा विमा कालावधीचा काळ संपून ४५ दिवस झाले आहे. मात्र विमाकंपनीच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नाही.

२०१६-१७ मध्ये किती क्षेत्रावरील केळीसाठी विमा काढला, किती रक्कम भरपाईपोटी मंजूर झाली याची माहिती विमा कंपनी देत नाही. या प्रश्‍नांबाबत शुक्रवारी (ता. १५) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीलाही विमा कंपनीचे प्रतिनिधी दोन तास प्रतीक्षा करूनही आले नाहीत.

फळ पीकविमा योजनेअंतर्गत जिल्हाभरात अनेक केळी उत्पादकांनी विमा काढला. त्याचा कालावधी १ नोव्हेंबर २०१६ ते ३१ जुलै २०१७ होता. विमा कालावधी आटोपल्यानंतर ४५ दिवसाच्या आत नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करायला हवी, असा नियम असताना अद्यापही शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नाही. शेतकरी याबाबत विमा कंपनीला विचारणा करतात, पण त्यांना बॅंकांमध्ये पैसे भरले आहेत, असे विमा कंपनीचे प्रतिनिधी सांगतात.

दरम्यान, वादळामुळे मे व जून महिन्यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जळगाव, यावल, चोपडा भागात अधिक फटका बसला होता. यासंबंधी किती विमाधारकांना नुकसानभरपाई मिळणार, याची माहितीही विमा कंपनी देत नाही. केवळ १९०० शेतकऱ्यांच्या केळीचे पंचनामे केले होते, अशी माहिती दिली जाते, असे शेतकरी डॉ. गणेश पाटील (किनोद, जि. जळगाव) यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com