गांधी जयंतीपर्यंत राज्यात हागणदारीमुक्‍ती

ग्रामविकास
ग्रामविकास

मुंबई ः राज्यातील सर्वच्या सर्व; म्हणजे ३८४ शहरे गांधी जयंतीपर्यंत (ता. २ ऑक्‍टोबर) हागणदारीमुक्‍त होणार आहेत. सध्या ३१५ शहरे हागणदारीमुक्‍त झाली आहेत, तर आणखी पन्नास शहरांची तपासणी भारतीय पतनियंत्रण संस्थेकडून (क्‍यूसीआय) सध्या सुरू आहे. या शहरांनाही हागणदारीमुक्‍ततेचे प्रमाणपत्र मिळणार आहे. गांधी जयंतीपर्यंत सर्व हागणदारीमुक्‍त करण्यासाठी नगरविकास विभागाने कंबर कसली आहे . राज्यातील शहरी भागांत आठ लाख ३२ हजार कुटुंबे उघड्यावर शौचास जातात, असा नगरविकास विभागाचा अंदाज आहे. यामुळे या विभागाने राज्यातील संपूर्ण ३८४ शहरे हागणदारीमुक्‍त करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला असून तो वेगाने राबवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे ऑक्‍टोबर २०१७ पर्यंत सर्व शहरे हागणदारीमुक्‍त होणार आहेत. यासाठी वैयक्‍तिक शौचालय (आयटी) उभारण्यासाठी खास प्रोत्साहन दिले जात आहे. जागेभावी अथवा इतर कारणासाठी वैयक्‍तिक शौचालय बांधणे शक्‍य नसेल तर समुदाय शौचालय (सीटी) उभारण्यावर भर दिला जात आहे. चार अथवा पाच कुटुंबांसाठी ही शौचालये बांधली जात आहेत. या दोन्ही प्रकारांबरोबर सार्वजनिक शौचालये (पीटी) बांधण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना (यूएलबी) प्रवृत्त केले जात आहे.  वैयक्‍तिक शौचालय बांधण्यासाठी रहिवाशांना आर्थिक अनुदानाच्या माध्यमातून मदत केली आत आहे. यामध्ये एका शौचालय उभारण्यासाठी बारा हजार रुपये दिले जातात. त्यात केंद्र सरकारच्या वतीने चार हजार रुपये, तर राज्य सरकारचा वाटा आठ हजार रुपये इतका आहे. समुदाय शौचालये उभारताना स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन दिले जाते. सार्वजनिक शौचालये उभारण्यासाठी महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायती यांना चौदाव्या वित्त आयोगाने दिलेल्या आर्थिक मदतीवर बांधण्यात येतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com