गारपीटग्रस्तांसाठी ५०० कोटींची मदत द्या : शेट्टी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर : राज्यातील विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी गारपिटीने उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांना दिलासा देणे अत्यावश्यक आहे. केंद्राने तातडीची मदत म्हणून महाराष्ट्राला ५०० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बुधवरी (ता. ७) लोकसभेत नियम ३७७ नुसार केली. तसेच कोरडवाहू शेतकऱ्यांना १५ हजार तर बागायती शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी मागणी केली. 

श्री. शेट्टी म्हणाले, की महाराष्ट्रात शेतकरी नैसर्गिक आपत्तीत सापडून उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यातच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देऊ असे आश्वासन दिले होते. त्याचे ही पुढेे काहीच झालेले नाही. पंधरा दिवसांपूर्वी  विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि गारपिटीने शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झालेली आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडातून घास हिरावून घेतलेला आहे. त्यामुळे शेतकरी अधिकच संकटाच्या खाईत लोटला गेला आहे. 

प्राथमिक अहवालानुसार १  लाख ८७ हजार हेक्टर वरील पिके पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राने तातडीची ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर करावी, असे शेट्टी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com