व्याजासह एफआरपी न दिल्यास फौजदारी : शेतकरी संघटना

व्याजासह एफआरपी न दिल्यास फौजदारी
व्याजासह एफआरपी न दिल्यास फौजदारी

कुडित्रे, जि. कोल्हापूर  : कुंभी कासारी साखर कारखान्याने हंगाम २०१७-१८ मधील गाळप झालेल्या उसाची ४४ कोटी २० लाख रुपये थकीत रक्कम व्याजासह आठ दिवसांत द्यावी अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला.

`एफआरपी''नुसार दर देण्यास बांधिल असून, राज्य बॅंकेकडून गॅपलोन मंजूर होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर थकीत ऊसबिल लवकरच वर्ग करण्याचे आश्‍वासन आमदार चंद्रदीप नरके यांनी दिले. आमदार नरके यांना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील यांनी निवेदन दिले. उपाध्यक्ष दादासाहेब लाड उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याने गाळप केल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी देण्याचा कायदा आहे. मात्र, साखरेचे दर पडले म्हणत शेतकऱ्यांचा हक्क डावलण्याचे काम प्रशासन करीत आहे. `कुंभी''कडील हंगाम २०१७-१८ मध्ये ४४ कोटी २० लाख ३४ हजार इतकी रक्कम थकीत असून, आठ दिवसांत नाही दिली तर कारखान्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. बदाम शेलार यांनीही शेतकऱ्यांची बाजू मांडली.

श्री. नरके म्हणाले, की हंगाम २०१७-१८ च्या सुरवातीला तीन हजार ४०० रुपये साखरेचे दर गृहीत धरून एफआरपी जाहीर केली. मात्र, आज हेच दर प्रतिक्विंटल २५०० रुपयांवर आले आहेत. ही प्रतिक्विंटल एक हजाराची घसरण झाली आहे. यामुळे २५ कोटी ८१ लाख रुपये शॉर्टमार्जिन आले. तरीही पहिल्या तीन आठवड्यांची ऊसबिले हंगाम ठरलेल्या ऊसदराच्या फॉर्म्युल्याप्रमाणे तीन हजारप्रमाणे शेतकऱ्यांना अदा केली. असे असले तरी २८८२ रुपये प्रतिटन एफआरपी देण्यासाठी बांधील आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com