टॅंकरची संख्या कमी
टॅंकरची संख्या कमी

सातारा जिल्ह्यात टॅंकरची संख्या घटली

सातारा  ः दुष्काळी भागात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने अनेक गावातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत झाली आहे. मागील सप्ताहाच्या तुलनेत टॅंकरची संख्या सतराने घटली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी दिली आहे.

 जिल्ह्यात माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्‍यांत मागील सप्ताहात ४५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. दरम्यान, मागील आठ दिवसांत दुष्काळी तालुक्‍याच्या अनेक भागांत दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक गावांतील पाणीटंचाई कमी झाली आहे. यामुळे १७ टॅंकर बंद करण्यात आले आहेत.

मंगळवारपासून (ता. १९) चार तालुक्‍यांत २८ टॅंकरद्वारे ४२ गावे व १३१ वाड्या-वस्त्यांवरील ७० हजार ७६ लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये माण तालुक्‍यात १३ टॅंकरद्वारे १८ गावे ९२ वाड्या-वस्त्यांवर, कोरेगाव तालुक्‍यात नऊ टॅंकरद्वारे १४ गावांत, खटाव तालुक्‍यात चार टॅंकरद्वारे सात गावे २४ वाड्या वस्त्यांवर, फलटण तालुक्‍यात दोन टॅंकरद्वारे तीन गावे १५ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे.

माण, कोरेगाव, खटाव व फलटण तालुक्‍यांतील ३० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अजूनही दुष्काळी तालुक्‍यात कमी अधिक स्वरूपात पाऊस सुरू आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com