मुंबईला पाणी पुरविणारी सातही धरणे भरली

मोडकसागर धरण, संग्रहित छायाचित्र
मोडकसागर धरण, संग्रहित छायाचित्र

मुंबई ः तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असलाने मुंबईला पाणी पुरवणारी सातही धरणे भरली आहेत. मोडकसागर, विहार, तुळशी आणि तानसा ही धरणे दोन महिन्यांत भरली असून उर्वरित अप्पर वैतरणा, भातसा व मध्य वैतरणा ही तीन मोठी धरणे दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने भरत आली आहेत. त्यामुळे मुंबईला वर्षभर मुबलक पाणी मिळणार आहे.

मुंबईला पाणी पुरवणारे तीन तलाव गेल्या महिन्यात भरून वाहू लागले होते. त्यामुळे मुंबईची पाण्याची चिंता मिटली होती. पालिकेच्या जलअभियंता विभागाने पुढील पावसाळ्यापर्यंत पुरेसा पाणीसाठा मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले होते. परतीचा जोरदार पाऊस तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून पडत आहे. त्यामुळे तलावांच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.

अप्पर वैतरणा, भातसा व मध्य वैतरणा ही मोठी धरणे भरत आली असून ती कोणत्याही क्षणी भरून वाहू लागतील, अशी माहिती जलअभियंता विभागाने दिली. २९ ऑगस्टला जोरदार पाऊस झाला. त्यानंतर काही दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र, पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आणि तलावांतील पाण्याची कसर या पावसाने भरून काढली.

आता सर्व धरणे भरल्यामुळे पालिकेच्या जलअभियंता खात्यात आनंदाचे वातावरण आहे. तलावांमध्ये यंदा १४ लाख २८ हजार ७५५ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. हा चार वर्षांतील उच्चांक आहे, असेही जलअभियंता विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com