शेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा
शेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा

शेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा

नागपूर  ः पाकिस्तान सीमेवर दररोज कुरापती करून भारतीय जवान आणि सामान्यांचे बळी घेत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला ठोस उत्तर देण्याचे सोडून भाजप सरकारने पाकिस्तानातून साखर आयात केली. देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असताना आयात केली असून, सरकारला देशातील शेतकऱ्यांना जगवायचे की पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना हे भाजप सरकारनेच स्पष्ट करावे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.   

भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना नागपूरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, देशात विक्रमी उत्पादन झालेल्या अन्नधान्याची आयात केली जात आहे. साखरेनंतर आता तूरदाळ आयात करण्यात आली. त्यावरूनच शासनाला शेतकरी जगवायाचाच नाही, हे सिद्ध होते. शेतमालाची उत्पादकता वाढीचे आवाहन थेट पंतप्रधान करतात आणि शेतकरी उत्पादकता वाढ करतात तेव्हा भाव पाडले जातात, अशी विरोधी खेळी खेळली जात आहे. 

शासकीय खरेदीचे चुकाने दिले गेले नाही. आज आत्महत्या करणारे शेतकरी थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठ्या लिहित आहेत. सरकारच्या धोरणाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीद्वारे सांगत आहेत. हे एकप्रकारचे भाजप-शिवसेना सरकारचे अपयश असल्याचेही श्री. पवार यांनी स्पष्ट केले. 

नागपूरात पावसाळी अधिवेशन होत असल्याबाबत विचारणा केली असता, अधिवेशन कुठे घ्यावे हा सरकारचा अधिकार आहे. त्याला आपला पाठिंबा राहील. सरकारला जाब विचारण्याचे काम आमचे आहे, ते आम्ही करूच, असेही अजित पवार म्हणाले. या वेळी माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com