नाशिकला वांगी लिलाव बंद पाडले

नाशिकला वांगी लिलाव बंद पाडले

नाशिक  : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्याला अवघा दोन ते अडीच रुपये किलोला भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी काही काळ लिलाव बंद पाडल्याची घटना सोमवारी (ता. १६) घडली. यामध्ये शेतकऱ्यांचे गाडीभाडेदेखील न सुटल्याने त्यांनी आपला संताप व्यक्‍त केला आहे. 

आवक वाढल्याने भाव कोसळले असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले आहे. मात्र, व्यापारीच एकत्र येत भाव पाडत असून, बाजार समिती प्रशासनदेखील व्यापाऱ्यांच्या बाजूने असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.  सोमवारी बाजार समितीच्या आवारात वांग्याचे लिलाव सुरू असताना प्रतिजाळी अवघा २५ रुपये भाव पुकारल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव प्रक्रिया बंद पाडत बाजार समितीच्या कार्यालयात धाव घेतली.

मात्र, येथील अधिकाऱ्यांनी आवक वाढल्याने आणि अक्षयतृतीया असल्याने बाजारात मालाला मागणी नसल्यानेच भाव पडले असल्याचे सांगत हात वर केले आहे. एकीकडे व्यापाऱ्यांची मक्‍तेदारी मोडीत काढण्यासाठी बाजार समिती व्यापाऱ्यांची संख्या वाढवायच्या मागे लागली आहे. त्यातून स्पर्धा निर्माण करून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल; मात्र तसे होताना दिसत नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com