शेतकऱ्यांच्या वाटेत विमानतळाचा अडथळा

Airport barrier in the way of farmers
Airport barrier in the way of farmers

जळगाव : नाइट लॅंडिंगसाठी विमानतळावरील धावपट्टीचे क्षेत्र वाढविण्यात येणार आहे. यामुळे परिसरात नशिराबादच्या शेतकऱ्यांचे साधारण दोन ते अडीच हजार एकर जमीन जात आहे. धावपट्टीमुळे शेतात जाण्याचा मार्ग बंद करण्याचे नियोजन प्राधिकरणाचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना १२ ते १५ किलोमीटरचा फेरा पडणार आहे. परिणामी, या प्रस्तावास नशिराबाद परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. या ठिकाणावरून पर्यायी रस्त्याची निर्मिती न झाल्यास या विरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 

विमानतळ परिसरातील भागपूर गावाजवळून उमाळ्याला मार्ग जोडतो. शहरासह पाचोरा, यावल, भुसावळ शहरालाही मार्ग जोडला जातो. या परिसरात शेतजमिनी आहेत. विमानतळ प्राधिकरणाने हे क्षेत्र वाढविण्याचे नियोजन केले आहे.

नवीन धावपट्टी झाल्यास नशिराबादकडून उमाळ्याकडे जाणारा मार्ग बंद होणार आहे. परिणामी, नशिराबाद येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठीचा रस्ता देखील बंद होणार आहे. शिवाय अन्य जवळचा पर्यायी मार्ग राहणार नसून त्यांना १५ किलोमीटरच्या फेऱ्याने जावे लागणार आहे. 

रस्तानिर्मितीवर सकारात्मक चर्चा

शेतकऱ्यांच्या या विषयासंदर्भात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी विमानतळ प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुनील मंगीरवाल, साईप्रसाद गोरे यांची भेट घेत याविषयावर चर्चा केली. जागेचे नकाशे, सद्यःस्थिती, पर्यायी रस्त्यांची माहिती अधिकाऱ्यांनी जाणून घेतली. यासह धावपट्टीच्या खालून रस्त्याच्या निर्मितीची काही उदाहरणेही दाखवून त्यानुसार रस्ता बनविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. या वेळी सकारात्मक चर्चा होऊन खासदार उन्मेष पाटील यांच्या पुढाकारातून प्रश्न सोडविण्याचे या वेळी ठरविण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com