सरकारने पीकविम्याचे वाजवले तीनतेरा : अजित पवार

विधीमंडळ अधिवेशन
विधीमंडळ अधिवेशन

नागपूर  : राज्यात पीकविमा योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. बीडमध्ये अनेक शेतकऱ्यांना १ रुपया पीकविमा दिला गेला आहे. या सरकारने जनाची नाही, तर मनाची तरी लाज बाळगायला हवी होती. ज्यांनी तुम्हाला निवडून दिले त्यांचीच तुम्ही फसवणूक करीत आहात, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली.

नियम २९३ अन्वये प्रस्तावावर श्री. पवार बोलत होते. ते म्हणाले, की मागील वर्षी जून महिन्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. या वेळी मोठा गाजावाजा करण्यात आला; परंतु आतापर्यंत किती शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा झाला, याचे आत्मचिंतन सत्ताधाऱ्यांनी करणे गरजेचे आहे. आम्ही गावोगावी फिरून शेतकऱ्यांना विचारले, की कर्जमाफी मिळाली की नाही. एकही शेतकरी उत्तर द्यायला तयार नाही. सरकारने या योजनेबाबत जाहिरातबाजी केली. कर्जमाफीचा अर्ज घेण्यासाठी ऑनलाइन पद्धत काढली ती यंत्रणा काही नीट नव्हती. बँकांमध्ये आणि सरकारच्या कारभारात ताळमेळ नव्हता. एकाही शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळाला नाही.

डिसेंबर महिन्यात बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना, तुडतुड्यांमुळे धानग्रस्त शेतकऱ्यांना पांडुरंग फुंडकर यांनी मदतीची घोषणा केली होती. ती मदत अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही. हे या सरकारचे अपयश आहे. हे सरकार शेतकरीविरोधी आहे, हे यातून स्पष्ट होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com