सरकारच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू नकाः अजित पवार

अजित पवार
अजित पवार

जिंतूर, जि. परभणी: शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात नाही. पीक विमा परतावा दिला जात नाही. सर्वच विभागातील नोकर भरती नाही. महिलांचे प्रश्न सुटले नाहीत. गेल्या निवडणुकीत भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे मतदारांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सरकारच्या फसव्या आश्वासनाला बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. गुरुवारी (ता. २२) राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जिंतूर येथील जाहीर सभेत श्री. पवार बोलत होत. या वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार विजय भांबळे, रामराव वडकुते, अमोल मिटकरी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी डॉ. कोल्हे म्हणाले, की गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याबद्दल शासनाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जनतेने करायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचा रोज एक गुन्हा घडतो. निवडणूक तोंडावर आल्याने शासन वेगवेगळ्या योजना अमलात आणत आहे. मात्र अगोदरच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याने सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे बेरोजगारी वाढली, शिक्षण, शेती, आरोग्य, पिण्याचे पाणी व इतर ज्वलंत प्रश्न कायम आहेत. या निवडणुकीत शासन कश्मीरमधील ३७० कलमाचा मुद्दा पुढे करून जनतेची दिशाभूल करून मते मागतील, त्यास मतदारांनी भुलू नये, असे यावेळी सांगितले.  आमदार विजय भांबळे यांनी पाच वर्षात जिंतूर, सेलू तालुक्यात केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखा मांडला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com