व्हिडिओ कॉन्फरन्समधून  राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत : अजित पवार

अजित पवार
अजित पवार

पुणे  : राज्यातील अनेक भागातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, त्यावर सरकारकडून काही उपाययोजना होताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर जेष्ठ नेते शरद पवार राज्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करीत आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत आहे. यातून प्रश्न आणि समस्या सुटणार नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात मंगळवारी (ता. १४) पार पडला. या वेळी खासदार वंदना चव्हाण, शहर अध्यक्ष चेतन तुपे, प्रवक्ते अंकुश काकडे, पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे आदी उपस्थित होते. त्यानंतर श्री. पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

या वेळी अजित पवार म्हणाले, की आघाडी सरकारच्या काळात पाणीटंचाई निर्माण झाल्यावर आम्ही तत्काळ मदत दिली. मात्र सध्याच्या सरकारकडून जनावरांना चारा आणि पाणी उपलब्ध करून दिले जात नाही. या सरकारचे मंत्री आणि अधिकारी बाहेर फिरायला गेले आहेत. सरकारची काम करण्याची मानसिकता नसल्याने प्रत्येक कामाला अटी लावल्या जात आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com