‘वान’च्या पाण्यासाठी अकोट, तेल्हारा बंद

‘वान’च्या पाण्यासाठी अकोट, तेल्हारा बंद
‘वान’च्या पाण्यासाठी अकोट, तेल्हारा बंद

अकोला ः जिल्ह्यातील वान प्रकल्पातील पाणी अकोला महानगराला देण्यास विरोध दर्शवीत मंगळवारी (ता. १०) अकोट व तेल्हारा तालुक्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्त बंद पाळला. या बंदला या दोन्ही तालुक्यांतील बहुसंख्य गावांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. एकीकडे नागरिकांचा विरोध वाढत चाललेला असताना लोकप्रतिनिधी मात्र अद्याप यापासून स्वतःला दूर ठेवत आहेत. सर्वपक्षीय नागरिक मात्र यामध्ये आता हिरिरीने सहभागी होत असल्याचे या आंदोलनाने दाखवून दिले.

तेल्हारा तालुक्यात असलेल्या वारी हनुमान येथील वान प्रकल्पातून तब्बल २४ दलघमी पाणी अकोला महानगरासाठी आरक्षित करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांमधून विरोध सुरू झाला आहे. वान प्रकल्प सिंचनाच्या उद्देशाने निर्माण झालेला असून तेल्हारा, संग्रामपूर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी कालव्यांसाठी गेल्या आहेत. आजपर्यंत मोजकेच वर्ष सिंचन झाले. 

गेल्या काही वर्षांत या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी विविध पाणीपुरवठा योजनांसाठी वापरले जात आहे. आता अकोल्याला २४ दलघमी पाणी आरक्षित केल्यास सिंचनालाही पाणी मिळणार नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये तयार झाली. वान प्रकल्प हा ८३.४७ दलघमी क्षमतेचा आहे. अकोला शहरासह सध्या सुरू असलेल्या योजनांसाठी  ५७.८७ दलघमी पाणीसाठा राखीव झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com