लोकाभिमुख प्रशासनाची जबाबदारी सर्वांचीच

लोकाभिमुख प्रशासनाची जबाबदारी सर्वांचीच
लोकाभिमुख प्रशासनाची जबाबदारी सर्वांचीच

सोलापूर : शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी सर्वांची आहे. गाव पातळीवरच लोकांची कामे झाल्यास तक्रारी कमी होणार आहेत. प्रशासनाचे कामकाज लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून शिपायांपर्यंत सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.

महसूल दिनानिमित्त महसूल शाखेतील ४६ कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरविण्यात आले. पोलिस आयुक्त महादेव तांबडे, मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, रोहयो उपजिल्हाधिकारी किशोर पवार, अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे, भूसंपादन अधिकारी प्रवीण सांळुखे, प्रांताधिकारी ज्योती पाटील, शिवाजी जगताप, प्रमोद गायकवाड, मारुती बोरकर आदी उपस्थित होते.

भोसले म्हणाले, ‘‘सध्या सेवा हमी कायद्यासारखे अनेक बदल महसूल विभागात झाले आहेत. त्याचाही अभ्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांनी करावा, आपल्या कामाबाबत कायमच प्रामाणिक राहिले पाहिजे.’’

तांबडे म्हणाले, ‘‘महसूल विभाग आणि पोलिस प्रशासन दोन्ही भाऊ आहेत. दोन्ही विभागांच्या कामकाजावरूनच प्रशासनाबाबत नागरिक आपले मत तयार करतात. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, असे काम केल्यास निश्‍चित प्रशासनाची प्रतिमा चांगली राहील.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com