सांगली जिल्ह्यातील सर्वच तलाव आटले

सांगली जिल्ह्यातील सर्वच तलाव आटले
सांगली जिल्ह्यातील सर्वच तलाव आटले

सांगली ः ताकारी, टेंभू, आरफळ योजनेच्या पाण्यामुळे कालव्याशेजारील गावांना, क्षेत्राला दिलासा मिळाला. मात्र, बहुसंख्य क्षेत्र कालव्याच्या टप्प्यात नाही. तिथे शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न कायम आहे. पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील गावे तर केवळ पाणीपट्टी भरली नसल्याने कोरडी राहिली आहेत. म्हैसाळ योजनेचे पाणी नुकतेच सुरू झाले. हे पाणी अतिशय संथ आहे. पाणीपट्टीअभावी कालव्यातून उपसा बंद आहे. छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांना पाणी मिळेना. तलाव आटले आहेत. विहिरींच्या पाण्याने केव्हाच तळ गाठला आहे.

गावे तहानली, टॅंकर मिळेना जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्‍यांत दुष्काळाने कहर केला आहे. खरीप वाया गेला. रब्बीची तर पेरणीच झालेली नाही. डाळिंब, द्राक्षबागा तहानेने व्याकूळ झाल्या आहेत. तालुक्‍यातील २१ गावांचे टॅंकर मागणीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पडून आहेत. एकही प्रस्ताव मंजूर झाला नाही. अन्य गावे, वाड्यांची टॅंकरची मागणी वाढू लागली आहे. आटपाडी तालुक्‍यातूनही १२ गावांचे टॅंकरचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत. २५ गावात विहिरी, बोअर अधिग्रहण केल्या आहेत. २ गावातील विहिरी, बोअरचे पाणी संपले आहे. टेंभू च्यालाभक्षेत्रातील ठराविक गावे सोडली तर अन्य बहुसंख्य गावांमध्ये टेंभू योजनेचे पाणी नाही आणि पावसाचेही नाही, अशी स्थिती आहे.

अत्यल्प पावसाने सिंचन योजनांना मर्यादा थोडा दिलासा मिळाला आहे. उर्वरित तालुका दुष्काळाने होरपळू लागला आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी गव्हाणपर्यंतच आले असून पूर्वभागात अजून हे पाणी पोहोचले नाही. तासगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातही पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. उपसासिंचन योजनांचे पाणी कालव्याशेजारील क्षेत्रापुरते मर्यादित राहिले आहे. तालुक्‍यात पाऊस अत्यल्प झाल्याने सिंचन योजनांच्या पाण्याला मर्यादा आल्या आहेत. म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या नियोजनाचा अभाव, पाणीपट्टी न भरण्याचा मोठा फटका मिरज पूर्वभागाला बसला आहे.  पाणी मागणीचे अर्ज नसल्याने पाणी मिळेना झाले आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळाची भयानता वाढत आहे. टंचाई निवारण उपाययोजना राबविणे आवश्‍यक आहे.

लोकप्रतिनिधी आणि विरोधकही थंड जिल्ह्याच्या पूर्वभागात दुष्काळाची तीव्रता मोठी आहे. लोक त्रस्त झाले आहेत. पिण्याच्या पाण्याचे टॅंकरही मिळेना झाले आहेत. प्रशासनाकडून वेळकाढूपणा सुरू आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींची कोंडी झाली आहे. विरोधी पक्षही थंड आहेत. विरोधकांकडूनही उठाव होताना दिसत नाही. त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com