रत्नागिरीत पीककर्जाचे ७२ टक्के वाटप

रत्नागिरीत पीककर्जाचे ७२ टक्के वाटप
रत्नागिरीत पीककर्जाचे ७२ टक्के वाटप

रत्नागिरी  ः खरीप पीककर्ज योजनेअंतर्गत जिल्ह्यातील उद्दिष्टापैकी ७२ टक्के कर्जवाटप पूर्ण झाले. ५८ हजार ४७२ शेतकऱ्यांना १६६ कोटी ५४ लाख ३२ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. कर्जवाटपासाठी जिल्हा उपनिबंधक विभागामार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखानिहाय मेळाव्यांचे आयोजन केले आहे. परिपूर्ण कागदपत्रे असलेल्या शेतकऱ्यांना मेळाव्यातच कर्ज मंजूर करण्यात येत आहे.  खरीपासाठी पीककर्जाच्या माध्यमातून केली जाते. जिल्हा बँकांसह सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना शासनाने कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले. या खरिपात नाबार्डच्या धोरणानुसार रोखीने, किसान क्रेडिट कार्डद्वारे पीक कर्जवाटप सुरू आहे. जिल्ह्याला २३१ कोटी १० लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. २७,०८२ हेक्टर क्षेत्रावर कर्ज काढण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ४७,०६५ सभासदांना २३ कोटी २१ लाख ३२ हजार रुपयांचे, राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत १०,१४१ सभासदांना १२८ कोटी ४९ लाखांचे, तर ग्रामीण बँकांमार्फत १,२६६ सभासदांना १४ कोटी ८४ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com