रत्नागिरी जिल्ह्यात दहा कोटी ६१ लाखांचे वाटप

Allotment of Rs. 10 crores in Ratnagiri district
Allotment of Rs. 10 crores in Ratnagiri district

रत्नागिरी ः क्यार चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भातशेती नुकसानीपोटी दोन टप्प्यात बारा कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. त्यातील दहा कोटी ६१ लाख रुपयांचे वितरण झाले आहे. आतापर्यंत ८७ टक्के वितरण करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

ऑक्टोबर महिन्यात क्यार चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. याच दरम्यान भात कापणीला सुरुवात झाली होती. अनेक शेतकऱ्यांची त्यामुळे तारांबळ उडाली. सलग पाच ते सहा दिवस पावसाचा जोर राहिल्यामुळे कापलेले भात शेतातच पडून राहीले होते. काही ठिकाणी उभे भात पिके आडवे झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पादनावर परिणाम झाला. 

शासनाने नुकसान झालेल्या शेतीचे सर्व्हेक्षण करा अशा सूचना दिल्या. ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहायक यांनी संयुक्त तपासणीही केली. त्या अहवालानुसार जिल्ह्यातील १३ हजार ७९१ हेक्टर शेतीचे नुकसान झाले. ६२ हजार ९५४ शेतकऱ्यांचा याचा फटका बसला. त्या शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रुपये नुकसानभरपाई शासनाकडून जाहीर करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ५ कोटी १३ लाख ६ हजार रुपये जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले. त्यातील ५ कोटी १४ लाख ६८६ रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले.

शासनाकडून दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याला आलेले ७ कोटी ६० हजार रुपये तालुक्यांकडे सुपूर्त केले होते. त्यातील ५ कोटी ५१ लाख २६ हजार ६०० रुपयांचे वितरण शेतकऱ्यांना केले गेले आहे. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा झालेली आहे. एकूण ८७.१७ टक्के वितरण झाली आहे. उर्वरित रक्कम येत्या काही दिवसात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com