चिपळुणात ५० टक्केच हापूस आंबा उत्पादन

वातावरणातील बदलाचा फटका हापूस आंब्याच्या पिकावर झाला आहे. या वर्षी आमच्या बागेत केवळ २५ टक्के हापूस आंबा मिळाला. बागेच्या मशागतीसाठी झालेला खर्चही निघताना मुश्कील आहे. -- विश्‍वास केतकर, आंबा बागायतदार, केतकी, ता. चिपळूण
हापूसचे यंदा उत्पादन कमीच
हापूसचे यंदा उत्पादन कमीच

चिपळूण, जि. रत्नागिरी  : बदलत्या हवामानाचा फटका कोकणातील हापूस आंबा उत्पादकांना बसतो आहे. आधीच लांबलेली थंडी त्यातच मागील १५ दिवसांपासून वाढलेले तापमान या दुहेरी संकटामुळे चिपळुणात यंदा हापूसचे उत्पादन ५० टक्‍क्‍यांनी कमी झाल्याने एकूण व्यवसायावर परिणाम होण्याची भीती आंबा बागायतदार व्यक्त करत आहेत.

चिपळूण तालुक्‍यातील हापूस आंबा लागवडीखाली एकूण ६ हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. यापैकी ३ हजार २५० हेक्‍टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. सुरवातीला चांगली थंडी पडल्याने आंबा पीक चांगले येईल, अशी अपेक्षा बागायतदारांना होती; परंतु लांबलेली थंडी व वाढलेल्या तापमानाचा आता आंबा पिकावर विपरीत परिणाम दिसून येत आहेत. यंदाच्या हंगामात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीला सुरवात झाली.

अगदी सुरवातीला पडलेल्या थंडीमुळे उत्पादनक्षम क्षेत्रापैकी ८० ते ८५ टक्के क्षेत्रावर मोहर आला होता; परंतु नंतर पुन्हा थंडीचा जोर वाढला. त्यामुळे फलधारणा कमी झाली. याबरोबरच तुडतुडा, भुरी रोगाचा प्रादुर्भाव यामुळे साधारण ७० टक्के मोहर गळून पडला. यंदा केवळ ५० टक्के मोहरात फलधारणा झाली. मात्र आंबा तयार होण्याच्या स्थितीत असतानाच एप्रिल महिन्यात तापमानात वाढ झाली. उष्णतेचे परिणाम आंब्यावर झाले. आंब्याचे फळ मोठ्या प्रमाणात गळून पडण्यास सुरवात झाली. आंबा डागाळू लागला. त्यामुळे वातावरणाच्या बदलाशी सामना करताना बागायतदार चिंतातूर झाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com