मेढा, जि. सातारा : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचीही कर्जमाफी करण्याची मागणी सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र आणि आम्ही जावळीकर चळवळीच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात प्रारंभी महाआघाडी सरकारने राज्यातील थकीत असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याबद्दल सरकारचे आभार व्यक्त केले आहे. पण, नियमित कर्ज परतफेड करणारा शेतकरी मात्र, आपली समाजातील पत सांभाळण्यासाठी गावातील सोसायटी, बॅंक थकीत राहू नये, गावचा पर्यायाने देशाचा आर्थिक समतोल राखण्यासाठी घेतलेले कर्ज फेडण्याची परिस्थिती नसताना जिवाचे रान करून, पोटाला चिमटा काढून, बायको, मुलगी यांच्या अंगावरील दागिने प्रसंगी गहाण ठेवून किंवा दागिने मोडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करतो. गहाण ठेवलेले दागिने सोडविण्यासाठी परत दुसरे कर्ज घेतो आणि तेही दरवर्षी नियमित भरतो. त्याला मात्र, कसलाही लाभ होत नाही. सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत असते. मागील तीनही कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय तरी कधी मिळणार? नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देऊन सरकारने न्याय द्यावा.
निवेदन देण्यासाठी सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष बजरंग चौधरी, सुनील धनावडे, अरुण जवळ, विजय वांगडे, प्रकाश धनावडे उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.