‘अम्फान’ चक्रीवादळ किनाऱ्याला धडकले

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘अम्फान’ तीव्र चक्रीवादळ बुधवारी (ता.20) दुपारी चार वाजल्यानंतर पूर्व किनारपट्टीवरील सुंदरबनजवळ असलेल्या पश्‍चिम बंगालच्या दिघा आणि बांग्लादेशाच्या हातीयाजवळ धडकले.
‘अम्फान’ चक्रीवादळ किनाऱ्याला धडकले
‘अम्फान’ चक्रीवादळ किनाऱ्याला धडकले

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘अम्फान’ तीव्र चक्रीवादळ बुधवारी (ता.20) दुपारी चार वाजल्यानंतर पूर्व किनारपट्टीवरील सुंदरबनजवळ असलेल्या पश्‍चिम बंगालच्या दिघा आणि बांग्लादेशाच्या हातीयाजवळ धडकले. जमीनीवर येताना वादळात ताशी 155 ते 185 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. ओडिशा आणि पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यावर पावसाचा जोरही चांगलाच वाढला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. जमीनीवर येताच वादळाचा वेग कमी होण्यास सुरवात झाली आहे.

बंगालच्या उपसागरात शनिवारी (ता.16) ‘अम्फान’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. त्यानंतर या प्रणालीची तीव्रता वाढत गेली. सोमवारी (ता.18) या प्रणालीचे महाचक्रीवादळात रुपांतर झाले. तर बुधवारी (ता.20) दुपारनंतर या महावादळाची तीव्रता कमी होऊ लागली. सकाळी पश्‍चिम बंगालमध्ये दहा वाजल्यापासूनच वादळाचा प्रभाव वाढू लागला होता. दुपारी तीन वाजता जमीनीवर येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. यावेळी वादळाचे केंद्र पश्‍चिम बंगालच्या दिघापासून 65 किलोमीटर तर बांग्लादेशाच्या सागर बेटापासून 35 किलोमीअर अंतरावर समुद्रात होते. ते ताशी 20 किलोमीटर वेगाने जमीनीकडे झेपावत होते. या वादळाच्या प्रभावमुळे ओडीशा परादीप आणि परीसरावर मुसळधार पावसाने हजेरी लावली बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत परादीप येथे 82 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.  दुपारनंतर हे वादळ परादीपच्या किनाऱ्यापासून उत्तरेकडे पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्याकडे सरकू लागले. या वादळाच्या प्रभावामुळे किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे वाहत होते. आकाशात 14 किलोमीटर उंचीपर्यंत दाट ढग जमा झाले होते. तसेच मुसळधार पावसाला सुरवात झाली होती. तर किनारपट्टीलगत 4 मीटर उंचीपर्यंत लाटा उसळत असल्याने सखल भागात पाणी भरू लागले. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास या वादळ जमीनीवर आल्यानंतर त्याची तीव्रता कमी होत असून, ही प्रणाली उत्तरेकडे सरकत असल्याने सिक्कीमसह ईशान्य भारतातील राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. साडेचार लाख लोकांना हलविले वादळाच्या तडाख्यातून वाचविण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलामार्फत (एनडीआरएफ) युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. वादळाच्या पार्श्र्वभुमीवर ओडीशा आणि पश्‍चिम बंगालमधील सुमारे साडे चार लाख नागरिकांना सरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याचे एनडीआरएफचे प्रमुख एस. एन. प्रधान यांनी सांगितले. जोरदार चक्राकार वाऱ्यामुळे कच्ची घरे, जुन्या इमारती, वीजेचे खांब, शेतातील उभी पीके, फळझाडे यांना वादळाचा तडाखा बसला आहे. मालमत्तेचे नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com