अमरावती : जिल्ह्याच्या अंतिम पैसेवारीच्या माध्यमातून १३ तालुक्यांतील १९६४ गावांपैकी १८०७ गावांना न्याय मिळाला आहे. या गावातील पैसेवारी ५० पैशाच्या आत असल्याने संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी या पार्श्वभूमीवर होत आहे. व्यवस्थापन संहिता २००८ मध्ये बदल करून सुधारित संहिता ७ ऑक्टोबर २०१७ रोजी जाहीर करण्यात आली. यामध्ये शास्त्रीय निकष व सुधारित कार्यपद्धती विहित करण्यात आली.
सुधारित निकषानुसार पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृद आर्दता निर्देशांक व इतर घटकांचा आधार दुष्काळ जाहीर करण्यासाठी घेण्यात आला. त्याआधारे मोर्शी तालुक्यात गंभीर स्वरूपाचा तर अंजनगावसूर्जी, अचलपूर, वरुड, चिखलदरा या तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला.
परंतु सर्वच तालुके दुष्काळप्रभावीत असल्याने अंतिम पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते. सोमवारी उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम पैसेवारी जाहीर केली. त्यानुसार संपूर्ण धारणी तालुका व अमरावती तालुक्यातील पाच गावे अशी एकूण १५७ गावे वगळता उर्वरित १३ तालुक्यातील १८०७ गावांमध्ये ४८ पैसेवारी जाहीर करून जिल्हाधिकाऱ्यांनी दुष्काळावर शिक्कामोर्तब केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.