पुणे : महिन्याला पाचशे रुपयांची केलेली मदत हि भिकारी समजुन केलेली आहे. हि शेतकऱ्यांची थट्टामस्करी असून, जखमेवर मिठ चोळणारी तरतूद आहे. याचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे. श्री. घनवट म्हणाले,''शेतकऱ्यांसाठी एकही तरतूद नसून, काही कोटी वीज जोड दिल्याचे सांगितले, मात्र वीज मिळाली नसून, बीले देखील सुरु केली आहे. असा भोंगळ कारभार सरकारचा सुरु आहे. तर आताच शेतमालाच्या किंमती उत्पादन खर्चाच्या ४० टक्क्यांनी कमी असून, उत्पादन खर्चाच्या ५० टक्के अधिक दर दिल्याची घोषणा देखील फसवी असून, शेतकऱ्यांची फसवणूक आणि चेष्ठा मस्करी करणारा अर्थसंकल्प आहे.‘‘ - ,
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.