तीस जानेवारीपासून अण्णांचे पुन्हा आंदोलन
तीस जानेवारीपासून अण्णांचे पुन्हा आंदोलन

तीस जानेवारीपासून अण्णांचे पुन्हा आंदोलन

राळेगणसिद्धी, जि. नगर ः सरकार सत्तेवर येऊन साडेचार वर्षे होऊनही लोकपाल व लोकायुक्तांची नेमणूक झाली नाही. मी अनेकदा याबाबत पाठपुरावा करूनही केवळ आश्‍वासनेच मिळाली. त्यामुळे ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे आंदोलन करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान कार्यालयास पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. मी ज्या ज्या वेळी आंदोलने केली, त्या त्या वेळी काही ना काही कारणे सांगून सरकारने चालढकल केली. सरकारच्या लेखी व तोंडी आश्‍वासनावर जनतेने विश्‍वास ठेवला. मात्र, हे सरकार सत्तेवर येऊन साडेचार वर्षे झाली, तरीही लोकपालाबाबतच्या नेमणुका झाल्या नाहीत. सरकारने जनतेचा विश्‍वासघात केला आहे. त्यामुळे महात्मा गांधी पुण्यतिथीपासून (३० जानेवारी) राळेगणसिद्धी येथे मी पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचे पत्र पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांना हजारे यांनी पाठविले. सरकार सत्तेवर आल्यानंतर लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीसाठी मी तीस वेळा पत्रव्यवहार केला. परंतु पंतप्रधानांनी एकाही पत्राचे उत्तर दिले नाही. सर्वोच्च न्यायालयाने फटकारूनही सरकारने या नेमणुका केल्या नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com