शेतकऱ्यांस एक वेळेस संपूर्ण कर्जमाफीची गरज; अण्णांचे उपोषण सुरू

शेतकऱ्यांस एक वेळेस संपूर्ण कर्जमाफीची गरज; अण्णांचे उपोषण सुरू
शेतकऱ्यांस एक वेळेस संपूर्ण कर्जमाफीची गरज; अण्णांचे उपोषण सुरू

राळेगणसिद्धी, जि. नगर : लोकायुक्त, लोकपाल नियुक्तीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी (ता. ३०) सकाळी अकरा वाजता यादवबाबा मंदिरासमोर उपोषणास प्रारंभ केला. दरम्यान, अण्णांचे  मन वळविण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन राळेगणमध्ये येणार होते, मात्र अण्णांनी ही भेट नाकारली. याप्रसंगी बोलताना अण्णा म्हणाले, ‘‘सरकारने उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ केले. मग शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यास काय हरकत होती. दुष्काळीस्थिती आणि सततच्या नापिकीमुळे शेतकरी गाळात रुतला आहे. त्याला त्यामधून बाहेर काढण्यासाठी एक वेळेस संपूर्ण कर्जमाफीची गरज आहे. त्यानंतर शेतकरी पुन्हा दारात उभा राहणार नाही. शेतकऱ्यांना पाच हजार रुपये पेन्शन देणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी शरिरात प्राण असेपर्यंत लढेन.’’ अण्णांची भूमिका ऐकून ग्रामस्थ व उपस्थितांना गहिवरून आले. अनेकांच्या डोळ्यांत पाणी दाटले होते.  अण्णा म्हणाले, ‘‘देशातील कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतो. त्याचे सरकारला काहीच वाटत नाही, याचा खेद वाटतो. देशातील उद्योगपतींची जेवढी काळजी सरकारला वाटते, तेवढी शेतकऱ्यांची का वाटत नाही, असा प्रश्‍न पडतो. शेतकऱ्यांची हाक सरकारला ऐकूच येत नाही. सरकार मतलबी, बहिरे झाले आहे, असे वाटते. शेतकऱ्यांचे हाल दिसत असूनही सरकार आंधळ्याची भूमिका का घेते, तेच समजत नाही.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com