अण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष घालून आवाज उठवावा

कांदाप्रश्‍नी लक्ष घालून आवाज उठवावा
कांदाप्रश्‍नी लक्ष घालून आवाज उठवावा

नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे कांदा विकावा लागत आहे. दुष्काळी स्थिती असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा सुरू आहे. या प्रश्‍नात लक्ष घालून शासनदरबारी आवाज उठवावा, अशी मागणी बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निवेदन देऊन विनंती केली.

प्रशांत गायकवाड यांनी नुकतीच अण्णा हजारे यांची भेट घेतली. सरकारने ‘नाफेड’मार्फत किमान २० रुपये किलो दराप्रमाणे कांदा खरेदी करावा किंवा त्याला किलोमागे २० रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी गायकवाड यांची आहे. श्री. हजारे यांनी शासनदरबारी शेतकऱ्यांतर्फे बाजू मांडावी, असे साकडे गायकवाड यांनी या वेळी घातले. 

सध्याचे कांद्याचे दर पाहता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. अनेक भागांत शेतकऱ्यांना कांदा फुकट विकावा लागत असल्याची स्थिती आहे. असे असताना सरकार याकडे फारसे गांभीर्याने पाहत नाही. कांदा उत्पादकांवर मात्र रडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या तातडीने आधार देण्याची गरज असल्याचे गायकवाड यांनी श्री. हजारे यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत आपण निश्‍चित लक्ष घालू व मुख्यमंत्री किंवा कृषिमंत्र्यांशी लवकरच चर्चा करू, अशी ग्वाही श्री. हजारे यांनी या वेळी दिली. 

श्री. हजारे म्हणाले, की शेतीमालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी आपण यापूर्वीच शासनाकडे केली आहे. सरकार मात्र वेळकाढूपणा करत आहे. उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव शेतकऱ्यांना मिळावा, ही आमची जुनीच मागणी आहे. ही मागणी आजही कायम आहे. शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासाठी वेगळे आंदोलन करण्याची वेळ आली तरी ते करू.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com