बाजार समित्यांना मिळणार राष्ट्रीय बाजाराचा दर्जा

बाजार
बाजार

पुणे ः शेतमाल पणन सुधारणांमधील सर्वात महत्त्वाची असणारी बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देणारी सुधारणा राज्यपालांच्या सहीने मंजूर झाली आहे. या सुधारणेमुळे आता एकूण आवकेच्या ३० टक्के शेतमाल ३ किंवा अधिक राज्यांतून येत असलेल्या बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे.  यामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, लातूर या महत्त्वाच्या बाजार समित्यांचा समावेश होणार असून, या समित्यांवर आता शासन नियुक्त २३ जणांचे प्रशासकीय मंडळाची नियुक्ती होणार आहे. तर या सुधारणेमुळे या बाजार समित्यांना निवडणुकांमधून वगळण्यात येणार आहे.  केंद्र शासनाच्या नवीन मॉडेल  विविध पणन सुधारणा राज्य शासनाने केल्या आहेत. यामधील सर्वांत महत्त्वपूर्ण सुधारणांमध्ये ग्रामीण महाराष्ट्रातील सर्वांत मोठी आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या मोठ्या बाजार समित्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यातून स्वतःच्या ताब्यात घेण्यात भाजप सरकारला यश येणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, लातूर या समित्यांचा समावेश होतो. याबाजार समित्या आर्थिक राजकीय दृष्ट्या महत्त्वाची सत्ता केंद्रे बनली आहेत. या बाजार समित्यांना कायद्याने राष्ट्रीय दर्जा देत, निवडणुकांमधूनच वगळण्यात आल्या आहेत. यामुळे आता याबाजार समित्यांवर शासन नियुक्त प्रशासकीय मंडळाची नियुक्ती होणार आहे. 

कार्यकारी समितीची होणार निवड शासन नियुक्त प्रशासकीय मंडळातून राष्ट्रीय बाजार समिती बाजारतळासाठी आपल्या सदस्यांमधून कार्यकारी समितीची नियुक्ती करणार आहे.   

प्रस्तावित सुधारणांची मुख्य वैशिष्ट्ये 

  • पशुधनाच्या संबंधातील पणनाचे विनिमयन करण्याकरीत तरतुदी
  • राष्ट्रीय नामांकित बाजारतळ व त्याच्याशी संबंधित आणि अनुषंगिक बाबींकरत तरतुदी 
  • विविध प्रकारचे बाजार स्थापन करण्याबाबत तरतुदी 
  • बाजार उप तळ म्हणून वखार, सायलो, शीतगृह, इत्यादींकरता तरतुदी 
  • इ नाम, इ व्यापारासाठीच्या तरतुदी  
  • असे असे प्रशासकीय मंडळ 

  • सभापती - पणनमंत्री अथवा राज्य शासनास योग्य वाटेल अशी कोणतीही व्यक्ती
  • उपसभापती - अपर निंबधक (सहकार) पदापेक्षा कमी दर्जाची नसेल असे अधिकारी
  • महसूल विभागातील एक या प्रमाणे ६ शेतकरी प्रतिनिधी 
  • दोन राज्यातील सरकारने शिफारस केलेले २ शेतकरी प्रतिनिधी
  • संबंधित बाजार समितीमधील पाच परवानाधारक व्यापारी 
  • कृषी प्रक्रिया संस्थेचा १ प्रतिनिधी
  • केंद्रिय किंवा राज्य वखार महामंडळासह, अधिकृत वखार चालकांचे प्रतिनिधी 
  • भारतीय रेल्वेचा प्रतिनिधी 
  • सीमा शुल्क विभागाचा प्रतिनिधी 
  • संबंधित बाजाराला सेवा देणाऱ्या बॅंकेचा प्रतिनिधी 
  • भारत सरकारच्या कृषी पणन सल्लागार विभागाचा अवर सचिव दर्जापेक्षा कमी दर्जाची नसलेली व्यक्ती 
  • महानगरपालिकेचे आयुक्त किंवा प्रतिनिधी 
  • सचिवपदी सहनिबंधक दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसलेला प्रतिनिधी
  • विशेष वस्तू बाजाराची होणार स्थापना बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्यानंतर या बाजार समित्यांना विशेष वस्तूंचा बाजारदेखील घोषित करता येणार आहे. यामध्ये फळे, भाजीपाला, फुले, कांदा, सफरचंद, संत्रा, मनुका, हळद, काजू, कापूस, औषधी आणि सुगंधी वनस्पती, पशुधन (गुरे, शेळी, मेंढी, गाढव, घोडा, मासळी, कुकुट आदी) आणि इतर कोणतेही पाच बाजार स्थापन करता येणार आहे.  संचालक मंडळ होणार तातडीने बरखास्त राज्य शासनाने राष्ट्रीय नामांकित बाजार तळाची अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर लगेच विद्यमान बाजार समिती कार्य करणे बंद करील आणि सर्व विद्यमान समिती सदस्य हे आपले पद धारण करणे बंद करतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com