नांदेड जिल्ह्यात आठ खरीप पिकांना पीकविमा लागू

नांदेड जिल्ह्यात आठ खरीप पिकांना पीकविमा लागू
नांदेड जिल्ह्यात आठ खरीप पिकांना पीकविमा लागू

नांदेड : प्रधानमंत्री पीकविमा योजनेतंर्गत जिल्ह्यात खरीप हंगामातील भात, ज्वारी, तीळ, मूग, उडीद, तूर, सोयाबीन आणि कापूस या आठ पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

पीकविमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजनेतंर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येईल. खरीप हंगामातील पिकांसाठी २ टक्के व कापसासाठी ५ टक्के ठेवण्यात आला आहे. 

सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखीम स्तर निश्चित करण्यात आला आहे. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोगांमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट, काढणीपश्चात नुकसान ही जोखीम यामध्ये समाविष्ट आहे. कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीकविमा उतरवण्याची अंतिम तारीख २४ जुलै २०१९ ही आहे. अधिकच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी, जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले.

पीकनिहाय प्रतिहेक्टरी पीकविमा रक्कम, भरावयाचा हप्ता

भात  ४३५०० ८७०
ज्वारी २४५०० ४९० 
तूर  ३१५००  ६३०
मूग   १९००० ३८०
उडीद १९००० ३८०
सोयाबीन ४३००० ८६० 
तीळ २३१००  ४६२
कापूस ४३०००  २१५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com