पारंपरिक साठवण पद्धतींना नव्या तंत्रज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न बायफ, पुणे आणि आयआयटी, मुंबई या संस्थेतील तज्ज्ञांनी केला आहे. पारंपरिक साठवणूक पद्धतींचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून त्यात काही सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत.
मागील लेखात आपण महाराष्ट्रातील गडचिरोली, नगर, पालघर, नंदुरबार जिल्ह्यांतील आदिवासी भागात वापरात असलेल्या धान्य आणि बियाणे साठवणुकीच्या विविध पद्धतीची माहिती पहिली. या सर्व पद्धती स्थानिक उपलब्ध वस्तू, धान्य आणि बियाण्याचे प्रमाण, धान्य प्रकार अशा विविध निकषांवर अवलंबून आहेत, तसेच एका (किंवा दोन) हंगामापुरते बियाणे साठवणूक करण्यासाठी उपयुक्त आहेत. या पारंपरिक साठवणूक पद्धतीबद्दल आणि त्याच्या दीर्घकालीन उपयोगितेबद्दल पुरेसा अभ्यास झालेला नाही. उत्तम आणि सुयोग्य पाऊसमान राहते तेव्हा स्थानिक पातळीवर पारंपरिक पद्धतीने बियाणे आणि धान्य साठवण योग्य होते. बदलते हवामान, पावसाचा अनियमितपणा, दुष्काळ यांचा सर्वाधिक दुष्परिणाम निसर्गावर अवलंबून राहणाऱ्या समाजावर आणि त्यांच्या पारंपरिक पद्धतींवर होतो, ही आजचे वास्तव नाकारता येणार नाही. या परंपरांना नव्याची जोड देण्याचा प्रयत्न करण्यासाठी बायफ, पुणे आणि आयआयटी, मुंबई या संस्थांमार्फत पारंपरिक साठवणूक पद्धतींचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून त्यात काही सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत.
स्थानिक बियाणे साठवणूक पद्धतीच्या मर्यादा
पारंपरिक बियाणे साठवणूक पद्धतीचा शास्त्रीय अभ्यास
पारंपारिक बीज साठवणपद्धती
टांगण परिपक्व झालेल्या चवळीच्या शेंगा, भेंडी, ज्वारीची कणसे, वांगीची फळे यांसाठी ही पद्धत वापरली जाते. यामध्ये पिकाच्या चांगल्या दर्जाच्या परिपक्व शेंगा/ फळे एकत्रित बांधून छताला टांगून ठेवल्या जातात. कोरड्या हवेशीर जागी ही टांगण बांधतात, जेणेकरून बीज पेरणीपर्यंत चांगले टिकते.
सितारी दुधी, दोडका, घोसाळ्यासारखी परिपक्व फळे/ कणसे तसेच मक्याची पात अर्धी सोलून उलटे करून कणसे चुलीच्या वर टांगली जातात. चुलीच्या धुरामुळे बीज खराब होत नाही. उंदराने बीज कुरतडण्याचा धोका कमी होतो.
लिंपण काकडी, भोपळा, कोहळा, टरबूज अशा गर असलेल्या फळभाज्या परिपक्व झाल्या, की गरासाहित बिया काढून घेतल्या जातात. त्यांचे मातीच्या किंवा कारवीपासून बनवलेल्या कुडाच्या भिंतींवर शेणाने लिंपण केले जाते. वर्षभर त्या बिया भिंतीवर चिकटून असतात. पेरणीच्या वेळी अलगद हाताने भिंतीचे पोपडे काढले जातात आणि बिया वेगळ्या करून पेरणीसाठी वापरतात. काकडी बियाण्याला हळद व मध वापरून ते भिंतीला लिंपून ठेवतात. सागाच्या पानावर शेणाचे लिंपण करून त्यावर काकडी, कारली, भोपळ्याच्या बिया ठेवल्या जातात.
वेटिया भाताच्या पेंढ्या/तणसपासून जाड दोरी तयार करतात. नंतर त्याला बांबूच्या आधाराने गोल वेटोळ्यासारखे विणून खोलगट आकार बनवला जातो. त्यामध्ये तांदूळ, उडीद, मूग इत्यादी प्रकारचे धान्य तसेच बियाणे साठवले जाते. वेटिया बनवणे हे खूप जिकरीचे आणि कौशल्याचे काम असते. वेटियाची साठवणूक क्षमता ५० किलो पासून ५०० किलो पर्यंत असते. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली तालुक्यात ही पद्धती आजही प्रचलित आहे.
वेण्याकरून साठवणूक लसूण, कांदा पातीसहित काढणी करून उन्हात वाळवून त्याच्या वेण्या बांधतात. या वेण्या घरात टांगून ठेवल्या जातात. नंतर गरजेप्रमाणे बियाणे किंवा विक्रीसाठी काढल्या जातात. ही पद्धत सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक इत्यादी ठिकाणी वापरली जाते.
सुधारित बियाणे साठवणूक यंत्र
- संजय पाटील, ९६२३९३१८५५( लेखक बाएफ संस्थेत कार्यरत आहेत)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.