तणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतानाच तणांचे निसर्गातील महत्त्व लक्षात घ्यावे. विविध घटकांचे जमिनीवर आच्छादन केल्यास जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होऊन पिकांच्या उत्पादनासाठी फायदेशीर ठरते. सेंद्रिय पदार्थांच्या आच्छादनाचे अनेक फायदे आहेत.
निसर्गाचे काम त्याच्या पातळीवर सुरू असते. वनस्पतीच्या वाढीच्या विशिष्ट टप्प्यावर येणाऱ्या किडीला रोखण्यासाठी आजूबाजूला अन्य वनस्पती आपोआप वाढण्याची क्रिया घडत असते. आपण अशा वनस्पतीकडे तण म्हणून पाहत असल्यामुळे कदाचित त्याचे उच्चाटन करू पाहतो. उदा. एखाद्या पिकाच्या मुळांवर सूत्रकृमींचा प्रादुर्भाव वाढताना शेजारी जर झेंडूचे रोप असेल, तर त्याच्या मुळाद्वारे स्त्रवलेल्या रसायनांमुळे सूत्रकृमींना अटकाव होतो. म्हणजेच मानवाने आपली अल्प बुद्धी लावून सरसकट तणांचे उच्चाटन न करता निसर्गाचे व तणांच्या निर्मितीमागचे प्रयोजन जाणून घ्यावे, अभ्यासावे व त्यानुसार कृती करावी. तणे म्हणजे आपल्या डोक्यावरचे केस समजावेत. केसांमुळे आपल्या डोक्याचे उन्हापासून संरक्षण होते. तापमान संतुलित राहण्यास मदत होते. केस जास्त वाढले तर आपण ते कापून मर्यादित ठेवतो. ते उपटून टाकत नाही. अशा प्रकारे तणे नियंत्रित ठेवावीत. कापून त्याचे जमिनीवरच आच्छादन करावे. त्याचे अनेक फायदे होतात.
तणांचे जैविक व्यवस्थापन जैविक उपायांनी तणांचे व्यवस्थापन करण्यासाठी जगभरातील शास्रज्ञ आज प्रयत्नशील आहेत. उदा. नागफणी तणांसाठी कोचीनल भुंगे, गाजर गवतासाठी झायगोग्रामा, वायकोलोराटा भुंगे, घाणेरी पाने खाणारे टिली ओनेमीन स्क्रू, भातखाचरातील तणांसाठी टोडपोल, कोळंबी किंवा मासे सोडतात. जलकुंभीसाठी निओचेटींना इकोरिनी ब्रचो भुंगेरे सोडतात. आच्छादन
जमिनीला सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन अत्यावश्यक आहेत. पिके केवळ सूक्ष्म जीवाणूंच्या अस्तित्वामुळेच वाढतात. त्यांना सतत खाद्य मिळाले तरच ते वाढत जाऊन पिकांना आवश्यक असणारी मूलद्रव्ये पुरवीत राहतील. या जीवाणूंचे खाद्य म्हणजेच सेंद्रिय पदार्थ सतत जमिनीला पुरविणे आवश्यक आहे. पिकाच्या अवशेषांचा पुनर्वापर केल्यामुळेच चीनमधील सेंद्रिय शेती यशस्वी झाली आहे. सेंद्रिय पदार्थांमुळे ‘Dirty farming is best farming and clean farming is worst farming’. शेतात उपलब्ध असणारा सर्व काडीकचरा, पालापाचोळा, पिकांचे अवशेष, धसकटे, तण, वाळलेली पाने, केळीचे कांदाडे, उसाचे पाचट अशा अनेक सेंद्रिय पदार्थांमुळे शेती दिसायला अस्वच्छ दिसली तरी त्यात सूक्ष्म जीवाणूंचे भांडार साठवले जाते. त्याचाच उपयोग पिकांचे उत्पादन वाढण्यासाठी होतो. त्यामुळे अस्वच्छ शेती ही खरी शेती आणि स्वच्छ शेत म्हणजे अयोग्य शेती पद्धती असे म्हटले जाते. पिकांचे अवशेष व बायोमासचे आच्छादन पिकांच्या ओळीत किंवा वाफ्यात, फळझाडांच्या आळ्यात संपूर्णपणे अंथरावे. मोकळी जमीन ठेवू नये. पिकांचे उरलेले अवशेष, कचरा कधीही जाळू नये. निंदलेले गवत धुऱ्यावर उचलून न टाकता पिकातच ओळीत बुडाला पसरून टाकावे. हे सर्व सूक्ष्म जीवाणूंचे खाद्य आहे. खालील प्रकारच्या सेंद्रिय पदार्थांचा आच्छादनासाठी वापर करावा.
तणांचे फायदे
आच्छादनाचे फायदे
- प्रशांत नायकवाडी, ९६२३७१८७७७, (लेखक सेंद्रिय शेतीतील तज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण अधिकारी आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.