शेतकऱ्यांसाठीच्या प्रतिमाह पाचशे रुपये मदतीत वाढ शक्य : अर्थमंत्री

शेतकऱ्यांसाठीच्या प्रतिमाह पाचशे रुपये मदतीत वाढ शक्य : अर्थमंत्री
शेतकऱ्यांसाठीच्या प्रतिमाह पाचशे रुपये मदतीत वाढ शक्य : अर्थमंत्री

न्यूयॉर्क, अमेरिका : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरमहा दिल्या जाणाऱ्या प्रस्तावित प्रतिमाह पाचशे रुपयांच्या मदतीमध्ये वाढ होऊ शकते, असे खुद्द केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनीच यासंबंधी सूतोवाच केले आहे. सरकारच्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ झाल्यास हा मदतनिधीही वाढविला जाईल अथवा विविध राज्य सरकारेदेखील त्यांच्या परीने यामध्ये योगदान देऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.    केंद्र सरकारच्या ‘किसान सन्मान निधी योजने’वर विरोधकांनी टीकेची झोड उठविली असून, प्रतिदिन केवळ सतराच रुपये शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. खुद्द राहुल यांनीच ही टीका केल्याने जेटली खवळले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्याने आता तरी प्रौढासारखे वागायला हवे, कारण ते कॉलेजमधील एखाद्या युनियनची नाही तर राष्ट्रीय निवडणूक लढवित आहेत, असा टोला जेटली यांनी लगावला.    ‘किसान सन्मान निधी योजने'च्या कक्षेतून केवळ पंधरा कोटी भूमिहीन शेतकरी बाहेर राहणार असून, पण त्यांनाही "मनरेगा'सारख्या योजनांचा आधार असेल तसेच अन्य लाभदेखील त्यांना मिळतील. आम्ही दरवर्षी बारा कोटी लघू आणि सीमांत शेतकऱ्यांना सहा हजार कोटी रुपयांची मदत देणार आहोत. त्याचप्रमाणे त्यांना सरकारच्या अन्य योजनांचाही लाभ मिळेल, यामध्ये गृहनिर्माण योजना, सवलतीच्या दरात अन्नधान्याचा पुरवठा, मोफत आरोग्यसेवा, रस्ते, वीज आणि गॅस कनेक्‍शन यांचाही समावेश आहे, असे त्यांनी नमूद केले. सध्या येथे वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या जेटली यांनी वृतसंस्थेला मुलाखत दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com