...तर देशातील वस्त्रोद्योग क्षेत्र संपुष्टात येईल : असदउद्दीन ओवेसी

असदउद्दीन ओवेसी
असदउद्दीन ओवेसी

नाशिक : मोदी सरकार प्रादेशिक व्यापक आर्थिक भागिदारी करार (आरसीईपी) करू पाहत आहे. त्यामुळे चीन, बांग्लादेश, व्हिएतनाम येथून कापड आयात केले जाईल. परिणामी, राज्यातील रोजगार कसा टिकेल असा सवाल करत सरकार हा करार करण्यात यशस्वी झाले तर देशातील वस्त्रोद्योग क्षेत्र संपुष्टात येईल, असा इशारा एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदउद्दीन ओवेसी यांनी दिला.

मालेगांव मध्यचे उमेदवार मुफ्ती इस्माईल यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी महाबलीपुरम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्रकिनारी केलेल्या स्वच्छतेच्या संदर्भात टोला लगवताना मालेगाव शहरासाठी काहीच करण्यात आले नाही, किमान मोदींनी शहर स्वच्छतेसाठी यावे, असा सल्ला त्यांनी दिला. कॉँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, की काँग्रेस संपली असून जगातील कुठलेही औषध काँग्रेसला पूर्वावस्थेत आणू शकत नाही. मालेगाव शहरातील विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com