भाजप, शिवसेना जनतेला फसवतेय ः अशोक चव्हाण

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण

भोकर, जि. नांदेड   ः भाजप आणि शिवसेनेची युती असली तरी, त्यांचे एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप सुरू असतात. त्यांचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे आहेत. दोघेही मिळून जनतेला फसविण्याचे काम करीत आहेत. या ढोंगी सरकारला आता मतदारांनी ओळखले आहे. देश गमावला, पुन्हा महाराष्ट्र गमवून नका. काँग्रेसचे विचार देशाला तारक ठरणार आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी केले.

भोकर तालुक्यातील रायखोड येथे सोमवारी आयोजित प्रचार सभेत श्री. चव्हाण बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील-रावणगावकर, सुभाष किन्हाळकर, गोविंदबाबा गोडवाड, आनंद पाटील, सुभाष कदम, सुरेश बिल्लेवाड आदी उपस्थित होते.

या वेळी श्री. चव्हाण म्हणाले, की भाजप सरकारने देशाचे वाटोळे केले आहे. राज्यातही तीच अवस्था आहे. या सरकारला खाली खेचण्याची संधी आलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या चुकीची पाच वर्षे दुरुस्ती करता येत नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत चूक न करण्याची मतदारांनी काळजी घ्यावी.  भाजपचे उमेदवार आयात केलेले आहेत. यापूर्वी त्यांनी या भागाचे नेतृत्व केलेले आहे. ते किती सरस आहेत याची मतदारांना जाणीव आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com