सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करणार ः अशोक चव्हाण

काॅंग्रेसची जनसंघर्ष यात्रा
काॅंग्रेसची जनसंघर्ष यात्रा

पुणे  ः महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असे अनेक प्रश्‍न असतानादेखील भाजप सरकारमधील मंत्री आणि आमदार महिलांची निंदानालस्ती करण्यात धन्यता मानत आहेत, अशा शब्दांत भाजप नेत्यांवर हल्ला चढवून या सरकारला आता सत्तेवरून खाली खेचण्यासाठी लोकांना एकत्र येण्याचे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी केले. सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करण्याचा इरादाही चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केला.

केंद्र व राज्य सरकारच्या अपयशी कारभाराविरोधात काढण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा गुरुवारी (ता.६) पुण्यात दाखल झाली. कात्रजपासून या यात्रेला सुरवात झाली. सहकारनगर येथे संघर्ष रथावर छोटेखानी सभा पार पडली. त्या वेळी श्री. चव्हाण बोलत होते.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शरद रणपिसे, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, आबा बागूल आदी नेते व शहरातील विविध भागातील महिला व पुरुष कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी श्री. पाटील म्हणाले, की भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. आता या सरकारला घरी पाठविण्याची वेळ आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com