औरंगाबाद शहरात फळे, भाजीपाला थेट विक्रीतून ६७ लाखांची उलाढाल

जवळपास १५ दिवसांपासून थेट विक्री करीत आहोत. पोलिस, कृषी, ‘आत्मा’ अशा सर्वच विभागांचे सहकार्य मिळते आहे. वाहतुकीत कोणतीही अडचण नाही. - भाऊसाहेब शेळके, भूमिपुत्र शेतकरी गटभिवधानोरा, ता.गंगापूर ग्राहक जोडले जात आहेत. त्यांची गरज कळून कायमस्वरूपी शेतमाल विक्रीची साखळी तयार होत आहे. जवळपास १७५ ग्राहक आजपर्यंत जोडले गेले आहेत. - योगेश कोठुळे, जय जवान, जय किसान शेतकरी मंडळ देवगाव ता पैठण
Aurangabad City will get a turnover of 67 lack by the buying vegetables
Aurangabad City will get a turnover of 67 lack by the buying vegetables

औरंगाबाद : शेतकरी ते ग्राहक थेट विक्री उपक्रमांतर्गत औरंगाबाद शहरात फळे, भाजीपाला विक्री सुरू आहे. त्याद्वारे आतापर्यंत ६७ लाख १२ हजार ७९५ रुपयांची उलाढाल झाली आहे. शेतकऱ्यांच्या थेट शेतमाल विक्रीच्या धडपडीला कृषी विभाग, ‘आत्मा’सह जिल्हा प्रशासन, पोलिस, सहकार विभाग व गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींचे सहकार्य मिळते आहे. 

‘लॉकडाउन’मुळे शेतातील उत्पादित फळे, भाजीपाला विक्रीचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर तोडगा म्हणून शेतकरी गट, कृषी विभाग, ‘आत्मा’ व जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीची संकल्पना पुढे आली. २४ गट व शेतकऱ्यांच्या तयारीपासून सुरू सुरु झालेला हा उपक्रम आता जवळपास ५९ शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांपर्यंत पोहोचला आहे.

शेतकरी गट आपल्याकडून फळे, भाजीपाला घेणाऱ्या ग्राहकांच्या नोंदी भ्रमणध्वनी क्रमांकासह घेत आहेत. २९ मार्च पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत सुरुवातीला दिवसाला दोन लाखापर्यंत होणारी उलाढाल आता दिवसाला तीन ते पाच लाखापर्यंत पोहोचली आहे. 

प्राप्त माहितीनुसार, १७ एप्रिलला एकाच दिवशी ६३२५ किलो भाजीपाला व ८६१० किलो फळांची विक्री झाली. यामधून जवळपास ३ लाख ९५ हजार ८७५ रुपये उलाढाल झाली. तर, २९ मार्च ते १७ एप्रिल दरम्यान १ लाख ६ हजार ६२१ किलो भाजीपाला व १ लाख ६६ हजार ४५९ किलो फळे अशी २ लाख ७३ हजार ८० किलोंची विक्री झाली. त्यातून जवळपास ६७ लाख १२ हजार ७९५ रुपये शेतकऱ्यांना मिळाले. 

वाजवी दर, ‘सोशल डिस्टन्सिंग’चा वापर मास्क, सॅनिटरायझर यासह इतर खबरदारीच्या उपाययोजना अमलात आणून शेतकरी आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करीत आहेत. जिल्ह्याच्या विविध भागातून शहरात येणाऱ्या या शेतकरी गटांना सर्वच विभागांचे सहकार्य मिळत हे. वाहतुकीत कोणतीही अडचण येत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.  फळे-भाजीपाला बाजाराचे विकेंद्रीकरण  

औरंगाबाद बाजार समितीमध्ये होणारी गर्दी थांबविण्यासाठी महानगरपालिकेच्या क्षेत्रात जवळपास ४० ठिकाणी भाजीपाला, फळे बाजार सुरू करण्यात आला. ‘सोशल डिस्टन्सिंग’बाबत आवश्यक खबरदारी घेऊन हे बाजार सुरू आहेत, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे बाजार समितीत आता केवळ ठोक फळे, भाजीपाला खरेदी-विक्री सुरू आहे, असे बाजार समितीकडून सांगण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com