औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडीसाठी रविवारी (ता २१) शांततेत मतदान झाले. सकाळी ८ ते दुपारी वाजेदरम्यान ९३.३० टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. या मतदानाच्या प्रक्रियेनंतर १८ जागेसाठी निवडणूक रिंगणातील ४८ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे.
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने तसेच एका गटात एकही अर्ज न आल्याने १८ संचालक निवडीसाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. शेतकरी विकास पॅनेल व शेतकरी सहकार विकास पॅनेल या दोन गटांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
स्थानिक पातळीवर नेत्यांच्या युती आणि आघाड्या तसेच आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्हा बँक निवडणूक प्रचाराचा फड चांगलाच रंगला होता. १,११४ मतदार या निवडणुकीसाठी मतदान करणार होते. मतदानाच्या टप्प्यानुसार पहिल्या टप्प्यात सकाळी आठ ते दहा या वेळात ३२१, सकाळी दहा ते दुपारी बारा दरम्यान ४५९, दुपारी बारा ते दोन दरम्यान २२३, तर दुपारी दोन ते चार या वेळात ४३ मतदार मिळून जिल्ह्यातील सर्व १० केंद्रांवरून १०४६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याची तसेच कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदानाची प्रक्रिया पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मुकेश बाराहाते यांनी दिली. सोमवारी (ता २२) बावीस होणाऱ्या मतमोजणीअंती होणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.