परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग, बेसुमार उपसा आदी कारणांमुळे जिल्ह्यातील २२ पैकी ८ लघु तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. जिल्ह्यातील लघु तलावांमध्ये सरासरी १९ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यातील देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, चिंचोली, आडगाव, केहाळ, भोसी (सर्व ता. जिंतूर), नखातवाडी (ता. सोनपेठ) या आठ तलावांतील उपयुक्त पाणीसाठा संपून जोत्याखाली गेला आहे. त्यामुळे तलावांवर अवलंबून असलेल्या गावातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
जिल्ह्यातील अन्य १४ लघु तलावांपैकी ७ तलावांमध्ये २५ टक्केपर्यंत, ६ तलावांमध्ये २५ ते ५० पर्यंत, तर १ तलावांमध्ये ५१ ते ७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यात पेडगाव तलाव ७ टक्के, आंबेगाव तलाव ४२ टक्के, झरी तलाव ६० टक्के, तांदूळवाडी तलाव २० टक्के, राणीसावरगाव तलाव ४९ टक्के, टाकळवाडी तलाव ५ टक्के, कोद्री तलाव १८ टक्के, पिंपळदरी तलाव ४३ टक्के, वडाळी तलाव २६ टक्के, चारठाणा तलाव २९ टक्के, कवडा तलाव १६ टक्के, मांडवी तलाव ५ टक्के, दहेगाव तलाव ४ टक्के, पाडाळी तलाव २५ टक्के या तलावांचा समावेश आहे.
‘करपरा’त ३४ टक्के पाणी
जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांपैकी करपरा (ता.जिंतूर) मध्यम प्रकल्पात ३४ टक्के आणि मासोळी (ता. गंगाखेड) मध्यम प्रकल्पांमध्ये ४० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. गोदावरी नदीवरील डिग्रस बंधाऱ्यांमध्ये २५.५० टक्के, मुद्दगल बंधाऱ्यांमध्ये ३९.७ टक्के, ढालेगाव बंधाऱ्यामध्ये ३५.८५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.