ऊसपीक घेताना अतिरिक्त खतांचा वापर टाळावा
ऊसपीक घेताना अतिरिक्त खतांचा वापर टाळावा

ऊसपीक घेताना अतिरिक्त खतांचा वापर टाळावा

सांगली ः  शेतकऱ्यांनी विक्रमी उसाचे उत्पादन घेतले पाहिजे. अतिरिक्त खतांचा वापर झाल्याने मातीचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे विक्रमी उत्पादन घेताना अतिरिक्त खतांचा वापर टाळावा, असे मत ऊसतज्ज्ञ ए. एन. साळुंखे यांनी व्यक्त केले. नांद्रे (ता. मिरज) येथे दैनिक ‘ॲग्रोवन’ आणि ‘महाधन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ॲग्रोसंवाद या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होते. या वेळी, राजकुमार कोगनुळे, महाधन कंपनीचे पंकज गोंजारी, उमेश जाधव, प्रकाश पाटील, अमित चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

ए. एन. साळुंखे म्हणाले, ‘ऊस लागवड करताना उत्तम दर्जाचे बियाण्यांचा वापर केला पाहिजे. त्याचप्रमाणे ऊस लागवडीसाठी ४ फुटांपासून ७ फुटांपर्यंत सरीचा वापर करावा. त्यामुळे उसाला भर देणे, आंतरमशाग ही कामे करणे सोपे जाते. खत व्यवस्थापन काटेकोर पद्धतीने केले पाहिजे. शेतकऱ्यांनी ऊस लागण करण्यापूर्वी माती परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. माती परीक्षणानुसार खतांची मात्रा ठरवली पाहिजे. ऊस पिकासाठी सेंद्रिय कर्ब महत्त्वाचा घटक आहे. याची जडणघडण चांगली झाली पाहिजे. यासाठी शेणखत, प्रेसमड याचा वापर केला पाहिजे. शेतकऱ्यांनी पाचट व्यवस्थापनाकडे वळले पाहिजे.

महाधन कंपनीचे एरिया मार्केटिंग मॅनेजर पंकज गोंजारी यांनी महाधन खतांची वैशिष्टे, कार्यपद्धती आणि कंपनीची माहिती दिली. प्रास्ताविक ‘ॲग्रोवन’चे जिल्हा प्रतिनिधी अभिजित डाके यांनी केले. तर गजानन पवार यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com