शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला : बच्चू कडू

बच्चू कडू
बच्चू कडू

नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते दिवसेंदिवस वाढत असल्याचे भीषण चित्र आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा असला तरी तो स्वतःला न्याय मागण्याऐवजी विभागला जात आहे. समस्या न सुटण्याचे हे खरे कारण आहे. तो राजकारण, जाती-धर्मात अडकला आहे. हेच सर्व समस्यांचे मूळ असल्याचे सूचक व्यक्तव्य प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले.  दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव, ग्रामदैवत मोहाड मल्ल व कान्होबा यात्रेनिमित्त आयोजित कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव प्रतिष्ठानच्या ६४ व्या प्रबोधन व्याख्यानमालेत विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष निवृत्ती रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ ‘राजकारण आणि समाजव्यवस्था’ या विषयावर आमदार कडू बोलत होते.  ते म्हणाले, की शेती प्रश्नांकडे कुणीही गांभीर्याने पाहत नाही. त्यासाठी आपण जात, पात, धर्म, पंथ विसरून शेतकरी म्हणून एक व्हायला हवे. आपला आवाज आपणच व्हावे. आज निवडणुका खर्चिक व राजकारण बिनभरवशाचे झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचा व सर्वसामान्यांचा आवाज होण्यासाठी राजकारणात तरुण, प्रामाणिक व सेवाभावी लोकांनी येण्याची आवश्यकता आहे.  या वेळी दिंडोरीचे पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, डॉ. भाऊसाहेब मोरे, विलास पाटील, शिवाजी पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शरद शिंदे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तू बोडके, उपजिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर व पदाधिकारी उपस्थित होते. पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह अनेक शेतकरी, दिव्यांग बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com