रावेरातील केळी उत्पादकांना मिळणार विमा परतावा

रावेरातील केळी उत्पादकांना मिळणार विमा परतावा
रावेरातील केळी उत्पादकांना मिळणार विमा परतावा

रावेर, जि. जळगाव : रावेर तालुक्‍यात या हंगामात अतिथंडी व अतिउष्णतेमुळे केळीचे मोठे नुकसान झाले आहे. हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या केळी उत्पादकांना या नुकसानीपोटी परतावे मिळणार असून, तालुक्‍यातील सर्वच महसूल मंडळांतील सुमारे नऊ हजार विमाधारक शेतकरी नुकसान भरपाईसंबंधी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी ६६ हजार रुपये विम्याचा लाभ मिळणार आहे. 

तालुक्‍यातील सुमारे साडेआठ ते नऊ हजार शेतकऱ्यांनी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी (एआयसी)द्वारे केळी पिकाचा विमा काढला होता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाने उच्चांक गाठल्याने सर्वच महसूल मंडळांतील केळी उत्पादक शेतकरी विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत. 

यावल-चोपडा भागातून पंचनाम्यांची मागणी गेल्या वर्षी व या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते. या तालुक्‍यांमधील अतिउपशामुळे विहिरी, कूपनलिकांची जलपातळी खालावली आहे. अतिउष्णतेमुळे केळी उद्‍ध्वस्त होत असून, अंदाजे २०० कोटी रुपयांचे नुकसान रावेर, चोपडा, यावल, रावेर भागांत झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार हरिभाऊ जावळे यांना निवेदन देण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com