औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कर्जपुरवठ्याच्या गतीला बॅंकांची खीळ

औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कर्जपुरवठ्याच्या गतीला बॅंकांची खीळ
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कर्जपुरवठ्याच्या गतीला बॅंकांची खीळ

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत सोमवारअखेर (ता. ८) उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ १४.२८ टक्‍के खरीप पीककर्ज पुरवठा झाला आहे. कर्जपुरवठ्याच्या गतीला बॅंकांचे अनास्था धोरण कारणीभूत असल्याची स्थिती आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी, व्यापारी व ग्रामीण बॅंकांना १२३२ कोटी १ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बॅंकांनी ५३ हजार ८८५ सभासदांना ३१५ कोटी ३१ लाख ९९ हजार रुपये कर्जवाटप करून २५.९९ टक्‍के उद्दिष्ट गाठले. 

जालना जिल्ह्यासाठी १०४६ कोटी ९१ लाख रुपये उद्दिष्ट होते. त्यापैकी केवळ २९ हजार २७५ शेतकऱ्यांना १८६ कोटी ५ लाख ३८ हजार रूपये कर्जवाटप झाले. केवळ १७.७७ टक्‍केच उद्दिष्ट झाले. परभणी जिल्ह्यासाठी १४७० कोटी ४४ लाख २३ हजार रूपयांच्या उद्दिष्टापैकी २२ हजार ९२९ सभासदांना १२१ कोटी १५ लाख १९ हजार रूपये कर्जवाटप झाले. बॅंकांनी ८.२४ टक्‍केच उद्दिष्ट गाठले.

हिंगोली जिल्ह्यात ११६१ कोटी ९६ लाख ७७ हजार रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १५ हजार ७२९ सभासदांना ७८ कोटी ५७ लाख ७४ हजाराचे कर्जवाटप झाले. 

बॅंकांचे उद्दिष्ट आणि कर्जवाटप

जिल्हा  उद्दिष्ट कर्जवाटप टक्‍का
जिल्हा बॅंक  ८२२ कोटी १२ लाख २३ हजार २२७ कोटी २६ लाख २३ हजार २७.६४
व्यापारी बॅंक ३४३२ कोटी ९३ लाख ७७ हजार  ३६५ कोटी ४८ लाख २९ हजार  १०.६५ 
ग्रामीण बॅंक ६५६ कोटी २७ लाख १०८ कोटी ३५ लाख ६६ हजार   १६.५१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com