मूलभूत प्रश्‍न आधी सुटले पाहिजेत : विश्वासराव पाटील

मूलभूत प्रश्‍न आधी सुटले पाहिजेत : विश्वासराव पाटील
मूलभूत प्रश्‍न आधी सुटले पाहिजेत : विश्वासराव पाटील

दु ष्काळनिधी, पिकांवरील रोगांच्या संकटासंबंधी मिळणारी वित्तीय मदत ही फक्त मलमपट्टी आहे. शेती, शेतकऱ्यासमोरचे मूलभूत प्रश्‍न सुटले पाहिजेत. खानदेश किंवा उत्तर महाराष्ट्रात नार-पार योजनेतून पाणी आणायला हवे. तापी नदीचे वाहून जाणारे पाणी अडवून ते खानदेशातील विविध नद्यांमध्ये वळविण्याची अत्यंत गरज आहे. - विश्‍वासराव पाटील, प्रयोगशील आणि अभ्यासू शेतकरी, लोहारा, ता. पाचोरा

  खानदेश किंवा राज्यात कोरडवाहू शेती ८४ ते ८५ टक्के आहे. कोरडवाहू शेतीसंबंधी मृदसंधारण, जलसंधारणाचे काम व्हायला हवे. गरजेएवढे पाणी शेतीला मिळाले पाहिजे. जलसंचय करून तो शेतापर्यंत पोचवावा. पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी विहीर किंवा कूपनलिका तेथे ठिबकची योजना लागू करावी. यामुळे पाण्याचा कमी वापर व पाणीबचत, पिकांना लाभ, असे फायदे दिसतील. वेळेवर पुरेशी वीज कृषिपंपांना द्यावी. कारण विजेची समस्या शेतीसमोर कायम आहे.  शुद्ध बियाणे हा महत्त्वाचा भाग आहे.  निकृष्ट बियाण्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. ज्या शासकीय,  खासगी रोपवाटिका, बियाणे पुरवठादार संस्था असतील, त्यांच्याकडून शुद्ध, दर्जेदार बियाणे, वाण पुरविले जावे. वाहून जाणारे पाणी उपयोगात आणण्यासाठी नार-पार योजना व तापी नदीचे पाणी अडवून ते वाघूर, कांग, अंजनी, गिरणा नदीपर्यंत आणले पाहिजे. यामुळे याभागातील दुष्काळी शिवार हिरवे होतील.    विश्‍वासराव पाटील, प्रयोगशील आणि अभ्यासू शेतकरी, लोहारा, ता. पाचोरा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com