सांगली ः यावर्षी चांगल्या मॉन्सूनचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने गतवर्षी प्रमाणेच यावर्षी सुद्धा जिल्ह्याला पुराचा सामना करावा लागू शकतो. याची जाणीव ठेवून यंत्रणांनी युद्धपातळीवर आवश्यक ती सर्व सज्जता ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित माॅन्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. चौधरी म्हणाले की, पाटबंधारे विभागाने संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी आत्तापासूनच नियोजन करावे. कोयना धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे कोयना धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग व त्याचा सांगली जिल्ह्यावर होणारा परिणाम याची शास्त्रशुद्ध माहिती प्रशासनाला तात्काळ मिळणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील विविध धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबद्दल दर दोन तासांनी माहिती देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित ठेवा.
सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांची समन्वयासाठी बैठक लावावी. पूरबाधीत १०४ गावे असून यातील ५२ गावांचे आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण झाले आहे. उर्वरित ५२ गावांचे प्रशिक्षण ही १७ मे नंतर घेण्यात येईल. यासह जिल्ह्यातील प्रत्येक गावाने सक्षम असे आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करावेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.