भंडारा जिल्ह्याची पैसेवारी निघाली ६५ पैसे

भंडारा जिल्ह्याची पैसेवारी निघाली ६५ पैसे
भंडारा जिल्ह्याची पैसेवारी निघाली ६५ पैसे

भंडारा : जिल्ह्यातील ८४५ पैकी अवघ्या १२९ गावांत ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली. परिणामी ७१६ गावांना दुष्काळी मदतीचा लाभ होणार नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्‍त होत आहे.  धान उत्पादक अशी ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परिणामी पाण्याची गरज असलेल्या या पिकाची उत्पादकता घटली. त्याची दखल घेत सुरवातीला तीन तालुके दुष्काळसदृश जाहीर करण्यात आले. मात्र अंतिम यादीत जिल्ह्यातील एकाही तालुक्‍याचा समावेश नव्हता. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष अंतिम पैसेवारीकडे लागले होते.  खरीप हंगाम २०१८ या ८४५ गावांची अंतिम पैसेवारी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यात खरिपाची ८९८ गावे आहेत. त्यापैकी ३९ गावे उजाड आहेत. त्यामुळे ८८५ गावांची पैसेवारी घोषित करण्यात आली. १४ रब्‍बी गावांची पैसेवारी रबी हंगामानंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेली १२९ गावे आहेत. त्याध्ये भंडारा तालुक्‍यात ४ तर मोहाडी तालुक्‍यातील ८१ गावांचा समावेश आहे. या अंतिम पैसेवारीने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. 

अशी आहे पैसेवारी भंडारा ः ६५, साकोली ः ७२, पवनी ः ६४, मोहाडी ः ४९, लाखांदूर ः ७०,  लाखनी ः ७३, एकूण ः ६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com