अवकाळीचा सोलापूर जिल्ह्याला मोठा फटका

अवकाळीचा सोलापूर  जिल्ह्याला मोठा फटका
अवकाळीचा सोलापूर जिल्ह्याला मोठा फटका

सोलापूर : जिल्ह्याला गेल्या चार महिन्यांत अधून-मधून झालेला अवकाळी पाऊस आणि वादळवाऱ्याचा मोठा फटका बसला. त्यात साधारण जानेवारी ते एप्रिलपर्यंत या चार महिन्यांत जवळपास २४ जनावरे व दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. त्याशिवाय रब्बी हंगामातील उरली सुरली पिके आणि काढणी हंगामातही व्यत्यय आला. यंदा पाऊस कमी असल्याने आधीच शेतकऱ्यांमध्ये चिंता असताना, आता या प्रकारामुळे त्यांना आणखीनच धास्ती बसली आहे. 

गेल्या पंधरवड्यापासून तर पुन्हा अवकाळी वारे आणि पावसाने अनेक भागात हजेरी लावली. या महिन्यात बार्शी तालुक्‍यातील उंबरगे येथील सुरेश सागरे यांचा वीज पडून, तर दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील बंकलगी येथील महादेव दिंडुरे यांचा वाऱ्यामुळे घरावरील दगड पडून मृत्यू झाला. 

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे सांगोला येथील जवळपास ६० हून अधिक, तर मंगळवेढा येथील १५ पेक्षा अधिक घरांची पडझड झाली. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्याच्या कालावधीत २४ जनावरे दगावली आहेत. यामध्ये म्हैस, बैल यांचा समावेश आहे. त्याशिवाय रब्बी हंगामातील काही पिकांची काढणी सुरू होती. त्यालाही याचा फटका बसला. 

शासकीय पातळीवर त्यांचे पंचनामे आणि मदतीचे प्रस्ताव तयार आहेत. लवकरच संबंधितांना त्याची मदत मिळेल, पण तोपर्यंत शेतकरी मात्र अडचणीच्या फेऱ्यात अडकत असल्याचे दिसते आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com