केरळमध्ये ६९ हजार पक्ष्यांना केले ठार

देशात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्यानंतर गुरुवारी तीन सदस्यीय पथक केरळच्या अलप्पुझा आणि कोट्टायाम जिल्ह्यात पोचले.
केरळमध्ये ६९ हजार पक्ष्यांना ठार केले 
केरळमध्ये ६९ हजार पक्ष्यांना ठार केले 

नवी दिल्ली ः देशात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्यानंतर गुरुवारी तीन सदस्यीय पथक केरळच्या अलप्पुझा आणि कोट्टायाम जिल्ह्यात पोचले. या ठिकाणी बर्ड फ्लूला रोखण्यासाठी आतापर्यंत ६९ हजारांहून अधिक पक्ष्यांना ठार करण्यात आले आहे. तर राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशमध्ये बर्ड फ्लू आधीच आढळला आहे. 

केरळ सरकारने बुधवारपर्यंत दोन जिल्ह्यांत ६९ हजारांहून अधिक बदक आणि कोंबड्यांना ठार केले. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री के. राजू म्हणाले, की संसर्गबाधित क्षेत्रात चिकन, मटण आणि अंडी विकण्यास मनाई केली आहे. पीडित शेतकऱ्यांना सरकारकडून भरपाई दिली जाणार आहे. आतापर्यंत अलप्पुझा येथे ६१,५१३, तर कोट्टायाम येथे ७७२९ पक्ष्यांना ठार करण्यात आले आहे. पक्ष्यांना मारल्यामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे. 

राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील सेतरावा आणि फलोदी भागात बुधवारी सुमारे ५० कावळे मृतावस्थेत आढळून आले. त्यांचे नमुने घेण्यात आले आहेत. कर्नाटकातील दक्षिणा आणि कन्नडा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर ६ कावळे मृत अवस्थेत आढळले. या कावळ्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. बर्ड फ्लूच्या वाढत्या संसर्गामुळे मध्य प्रदेशने उत्तरेकडील राज्यांसोबतचा पोल्ट्री व्यापार १० दिवसांसाठी बंद केला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com