सांगली : स्व. वसंतदादा पाटील यांनी सामान्य जनतेची विधायक कामे केली आहेत. त्यांनी सहकार वाढविले आहे. दादांसारखे मित्र आज कोणीही नाही. असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही, असे मत माजी मंत्री, आमदार पतंगराव कदम यांनी व्यक्त केले.
सांगली येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. वंसतदादा पाटील जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कर्यक्रमात ते बोलत होते. सांगलीत पद्माळे (ता. मिरज) येथे जन्मशताब्दीनिमित्त गावात फेरी काढून अभिवादन केले. या वेळी माजी आमदार हाफीज धत्तुरे, वसंतदादा पाटील कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील अादी उपस्थित होते.
ते म्हणाले, की दादांनी शेतकऱ्यांचा विकास केला. मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना दादांनी प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांना घेऊन काम केले आहे. राज्यभरात सहकार, शिक्षण यासह अन्य संस्थांचा डोलारा उभा केला. त्यामुळे राज्य समृद्ध झाले. कोणीही काहीही म्हणत असले तरी शरद पवार यांना दादांनीच मुख्यमंत्री केले, याचा मी साक्षीदार आहे, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, सांगलीत सोमवारी (ता.१३) वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. सकाळी वसंतदादांच्या समाधी स्थळावर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रतीक पाटील, श्रीमती शैलजा (भाभी) पाटील यांनी अभिवादन केले.