ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ११ हजार कोटी थकविले : राहुल गांधी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ११ हजार कोटी थकविले : राहुल गांधी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ११ हजार कोटी थकविले : राहुल गांधी

नवी दिल्ली : देशातील कृषिक्षेत्रातील संकटाला भाजपचे सरकार जबाबदार असल्याचे टीकास्त्र कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज डागले. भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील राज्य सरकारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल ११ हजार कोटी रुपये थकविले असून, दुसरीकडे ३० हजार कोटी रुपये बड्या उद्योगपतींच्या खशात घातले असल्याचा हल्लाबोल गांधी यांनी केला. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ११ हजार कोटी थकविले असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर गांधी यांनी फेसबुक पोस्टद्वारे भाजपवर निशाणा साधला आहे. गांधी यांनी म्हटले आहे, की वर्षभर शेतात राबून शेतकरी उसाचे पीक घेतो. हा ऊस साखर कारखान्यांमध्ये गेल्यानंतर त्याचा मोबदला शेतकऱ्यांना दिला जात नाही. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील राज्य सरकारांनी ऊस उत्पादकांचे सुमारे ११ हजार कोटी रुपये थकविले आहेत. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला, एका बड्या उद्योगपतीने दहा दिवसांपूर्वी सुरू केलेल्या कंपनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंत्राट देत ३० हजार कोटी रुपये त्या उद्योगपतीच्या खिशात टाकले. चालू वर्षीच्या एप्रिल महिन्यापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी २० हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा दावाही गांधी यांनी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com